
उत्कट भव्य तेचि घ्यावे, मळमळीत अवघेचि टाकावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे...भूमंडळी ! समर्थांचे हे शब्द दासबोधातून आपणास भेटतात. दासबोध आपल्या जीवनात कसा उतरेल, याची काळजी घेण्यासाठी उत्कटत्वाने दासबोधाला जाणून घेणं आवश्यक आहे. याच अनुषंगाने १९८९ मध्ये दासबोध अभ्यासकांच्या शिबिरात प.पू. सद्गुरुदास महाराजांनी केलेले उद्बोधन आपणास समर्थांच्या आणखी समिप आणतं... मनात भक्ती नि भव्यतेची आस पेरतं.
Feb 16, 2023
8 min

साधकांच्या आयुष्यात शिबिरांचं अत्यंत महत्त्व असतं. कारण, शिणलेलं मन आणि बिघडलेला मेंदू रस्त्यावर आणण्याचं काम शिबिरं करतात. आळस, आशा अन् आसक्ती ही त्रिसूत्री, ते कधी सोडावे अन् कधी अंगिकारावे याविषयी अकोला येथील शिबिरात प.पू. श्री. सद्गुरुदास महाराजांनी केलेले उद्बोधन कानात प्राण आणून ऐकावं असंच आहे. चला तर ऐकुया, महाराजांच्या शब्दांत याविषयीचे मार्गदर्शन...
Feb 9, 2023
11 min

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात उपासनेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मग ही उपासना म्हणजे नेमकी काय असते, उपासना का करावी, कशी करावी, त्यासाठी मन एकाग्र कसे करावे, उपासनेचे अंतरंग अन् बहिर्रंग कसे असतात, या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी अत्यंत सोप्या शब्दांत दिलेली आहेत. ऐकावे अन् मनात रुजवावे असे हे शाश्वत चिंतन ऐका आणि इतरांपर्यंत पोहोचवा.
Feb 2, 2023
10 min

आज प्रजासत्ताक दिन. त्यानिमित्त सर्व देशबांधवांना शुभेच्छा. कोणत्याही राष्ट्राच्या जडणघडणीत सर्वात महत्त्वाचा वाटा असतो शिक्षणाचा. आजच्या शिक्षणपद्धतीवर तुम्ही पूर्ण समाधानी आहात का,असा प्रश्न विचारला तर बहुतेक लोकांचे उत्तर नकारार्थी असते. मग, कोणती शिक्षण पद्धती आपले समाधान करू शकते, यावर पूज्य सद्गुरुदास महाराज जेव्हा मार्गदर्शन करतात, तेव्हा ते चिंतन मनातील विचारांना अधिक प्रगल्भ करते...हे विचारांचे अनमोल धन मनात जपा आणि मनोमनी पोहोचावा...ही देखील देशाच्या प्रगतीसाठी आपले मोलाचे योगदान ठरू शकते.
Jan 26, 2023
13 min

मकर संक्रांतीच्या पर्वाचे महत्त्व काय आहे, त्याचा अन् सूर्योपासनेचा काय आणि कसा संबंध आहे, संक्रमणकाळात दानाचे महत्त्व का आहे या आणि अशा अनेक बाबींची उलगड केली आहे, प.पू. सद्गुरुदास महाराज यांनी. मकर संक्रांतीच्या मुहुर्तावर प्रत्येकाने ऐकायलाच हवे आणि इतरांनाही ऐकवायला हवे असे हे पवित्र विचारांचे तिळगूळ.... त्याचे सेवन करा आणि आयुष्यातील नवसंक्रमणाचे सस्मित स्वागत करा.
Jan 12, 2023
13 min

जि म्हणजे जिवंतपणा. जा म्हणजे जागेपणा. बा म्हणजे बाणेदारपणा. ई म्हणजे ईश्वरार्पण वृत्ती. असा गुणसमुच्चय असणारी माता म्हणजे राजमाता जिजाबाई, अशा शब्दांत सद्गुरुदास महाराज जिजाऊ मासाहेबांचं यथार्थ वर्णन करतात. पौष शुद्ध पौर्णिमा, म्हणजेच राजमाता जिजाऊंची जयंती. ही तिथी संशोधित करण्याचं महान कार्य प.पू. सद्गुरुदास महाराज (म्हणजेच पूर्वाश्रमीचे शिवकथाकार विजयराव देशमुख) यांनी केलं. आठ वर्षे अविरत संशोधन करुन त्यांनी ही तिथी शोधून काढली आणि त्याची नोंद आपणास शककर्ते शिवराय या त्यांच्या द्विखंडात्मक शिवचरित्रामध्ये पाहावयास मिळते. पौष शुद्ध पौर्णिमा शके १५१९ म्हणजेच, १२ जानेवारी १५९८ ही तिथी इतिहासकारांबरोबर सरकारनेही मान्य केली. म्हणून, ७,८ व ९ जानेवारी १९८२ मध्ये सिंदखेड राजा येथे जिजाऊंचा जन्मोत्सव श्री सद्गुरुदास महाराजांनी खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला. अभूतपूर्व अशा या उत्सवानंतर दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचा जन्मोत्सव इथे साजरा होतो आहे. आजचा पॉडकास्ट मातोश्री जिजाऊंच्या समर्पित. त्यांच्याविषयी सद्गुरुदास महाराजांनी सांगितलेला शब्द नि शब्द श्रद्धापूर्वक ऐकावा, मनात कायम साठवून ठेवावा आणि त्यातून फुलणारी प्रेरणा मनोमनी जागवावी.
Jan 5, 2023
13 min

प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी भक्तांच्या रक्षणार्थ रचलेले आणि अनेक दत्तभक्तांच्या नित्य पठणात असलेले असे घोरकष्टोद्धरण स्तोत्र. प.पू. सद्गुरुदास महाराजांनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची निर्मिती आणि त्याचा अर्थ अतिशय सोप्या शब्दात उलगडून सांगितला आहे. त्यातील काही भागाचा अर्थ आपण मागील पॉडकास्टमध्ये जाणून घेतला. या भागात ऐकुया, त्याचाच उत्तरार्ध...
पत्रभेट व श्री गुरुमंदिर परिवाराची परंपरा, उपक्रमांची माहिती घेण्यासाठी आमच्या www.patrabhet.in या संकेतस्थळास जरुर भेट द्या.
Dec 29, 2022
8 min

प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी अनेक प्रासादिक ग्रंथाची, स्तोत्रांची रचना केली आहे. स्वामी महाराजांनी भक्तांच्या रक्षणार्थ रचलेले आणि अनेक दत्तभक्तांच्या नित्य पठणात असलेले असे घोरकष्टोद्धरण स्तोत्र. प.पू. सद्गुरुदास महाराजांनी घोरकष्टोद्धरण स्तोत्राची निर्मिती आणि त्याचा अर्थ अतिशय सोप्या शब्दात उलगडून सांगितला आहे. गुरुप्रबोध नवनीतच्या आजच्या भागात आपण ऐकूया - 'घोरकष्टोद्धरण स्तोत्र'.
Dec 22, 2022
10 min

उत्तम घराचे स्वप्न प्रत्येकाचंच असतं. पण घराची संकल्पना काय? कोणत्या घरात ईश्वराचं वास्तव्य असतं ? कोणत्या घरात सुखसमृद्धी नांदत नाही? आणि कोणत्या घरात आनंद, समाधान प्राप्त होऊ शकतं. अशा आपल्या जीवाळ्याच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पूज्य श्री सद्गुरुदास महाराजांचे
हे मौलिक मार्गदर्शन अवश्य ऐकावे.
Dec 15, 2022
11 min

परमपवित्र, वेदतुल्य अशा श्री गुरुचरित्राच्या प्रत्येक अध्यायात काही रहस्य दडलेलं आहे. गुरुचरित्रात श्री नृसिंह स्वामींनी अनेक लोकांचा उद्धार केल्याच्या कथा आहेत. या ग्रंथातील ३८ व्या अध्यायात, भक्तीमार्गाचं अनुसरण केल्यामुळे भास्कर नावाच्या गृहस्थाचं कसं सर्वार्थानं कल्याण झालं, याविषयी आज ऐकणार आहोत. यातच दडलेला आहे, श्री गुरुचरित्रात दडलेला एक विलक्षण संदेश, जो परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांनी सर्वांसाठी उलगडून दाखवला आहे.
Dec 8, 2022
12 min
Load more
