Show notes
महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशकं सुरू आहे. तो सोडवण्यासाठी शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या एका विधानाने या वादाला नव्याने तोंड फुटलंय. कर्नाटक सरकार महाराष्ट्राची, सांगलीतली जवळपास 42 गावं ताब्यात घ्यायचा विचार करतंय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय.

