Show notes
मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर . आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ, जाणीव असणारे मराठीतील महत्वाचे लेखक , कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन केले.विविधांगी लेखन करताना कुसुमाग्रज "क्रांती " ही साहित्याची प्रेरणा मानतात. माणसांच्या मनावर संस्कार करणे हा शब्दांचा स्वभाव, आणि साहित्य हे शब्दाश्रीत असल्यामुळे वाचकांच्या श्रोत्यांच्या मनावर संस्कार केल्याशिवाय रहात नाहीत. कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणाऱ्या आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षं पूर्ण झाली तेंव्हा "स्वातंत्रदेवीची विनवणी " ही कविता कुसुमाग्रजांनी लिहिली ,आज भारताला स्वातंत्र मिळून ७३वर्ष झाली तरी कवितेत मांडलेले प्रश्न आणि भावना त्याच आहेत. प्रत्येकाला विचार करायला लावणारी कविता....



