Show notes
चाणक्य नीति मधील हा श्लोक आपल्याला सांगतो कि, घडून गेलेल्या गोष्टीबद्दल खेद करीत बसू नये, तसेच भविष्यात काय होणार आहे ह्याची चिंता करीत बसू नये. सांडलेले दूध जसे पुन्हा वापरता येत नाही, तसेच एखादी चूक हातून घडल्यामुळे अपयश आले असेल, तर ती वेळ पुन्हा हाती येणार नाही. म्हणून ती चूक सुधारून पुढचा मार्ग स्वीकारणे मनुष्याला त्याच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. तसेच पुढे काय होईल याची चिंता करीत बसणे अजिबात योग्य नाही, कारण भविष्य कधीच आपल्या स्वाधीन नसते. "गतं न शोच्येत्", आणि "भविष्यम नैव चिंतयेत्" या दोन चरणाचा प्रयोग वेगवेगळा देखील करतात.
Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms:



