Show notes
नोव्हेंबरच्या दोन दिवसांत महाराष्ट्रात असा पाऊस पडला की 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं, त्यापूर्वी 55 वेळा वीज पडून 70 लोकांचा जीव गेला तर पूर आणि दरड कोसळून 103 लोक दगावले. हे नेमकं काय घडतंय? हवामान बदलाबद्दल आपण अनेकदा बोलतो पण हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. भारतात जानेवारी ते सप्टेंबर 2023 या 9 महिन्यांमध्ये जवळपास दर दिवशी तीव्र हवामानाची एकादी घटना घडते आणि यात अपरिमित हानी झालीय. गेल्या 9 महिन्यांत भारताला बसलेल्या हवामानाच्या या तडाख्याची ही सोपी गोष्ट.

